ग्रामपंचायत स्तरावर प्रकट करावयाची माहिती
१. सर्वसाधारण माहिती
पदनाम नाव दूरध्वनी क्रमांक
सरपंच
श्रीम. चंद्रभागा चंद्रकांत जाधव
9076038073
तंटामुक्ती समिती अध्यक्ष
श्री. गंगाराम केशव अंबडसकर
9322979827
ग्रामपंचायत अधिकारी ( ग्रामपंचायत सचिव )
श्री. अक्षय बाळू चोपडे
7588761536
ग्राममहसूल अधिकारी
सौ नयन मुरलीधर बोबडे
9860180863
पोलीस पाटील
श्री. किरण संतोष चव्हाण
8605912442
ग्रामपंचायत शिपाई
श्री. प्रसाद रामचंद्र गोरीवले
8007825089
कृषी सहायक
श्री. स्वप्नील आत्माराम चेके
7030317990
जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांचा तपशील
२. माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांचा तपशील ( ग्रामपंचायतच्या बाहेरील भिंतीवर प्रसिद्ध करणे आवश्यक )
पद नाव पदनाम दूरध्वनी क्रमांक
जन माहिती अधिकारी
श्री. अक्षय बाळू चोपडे
ग्रामपंचायत अधिकारी
7588761536
प्रथम अपिलीय अधिकारी
श्री. एम. व्ही. कुरई
विस्तार अधिकारी ( ग्रा. प. )
9404161465
द्वितीय अपिलीय अधिकारी
मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग
३. भिंतीवर प्रसिद्ध केलेली कोणतीही माहिती हि दिशाभूल करणारी किंवा चुकीची किंवा अद्ययावत नसलेली असल्यास जन माहिती अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी. नागरिकांना माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम १८ अन्वये राज्य माहिती आयोगाकडे तक्रार दाखल करता येईल.
माहिती अधिकार अधिनियम २००५
  • कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेल्या अभिलेखाची छायांकित प्रत घेणे, काम आणि अभिलेख यांची तपासणी करणेचा हक्क नागरिकांना आहे.
  • माहिती मिळविण्याकरिता जन माहिती अधिकारी यांचेकडे संपर्क करावा.
  • माहिती मिळविण्यासाठीचा अर्ज रुपये १०/- फीसह ( रोख / दर्शनी धनाकर्ष / धनादेश / न्यायालयीन मुद्रांक यापैकी एका स्वरुपात फी भरता येईल. ) जन माहिती अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
  • माहितीचा अर्ज भरण्यासाठी आपणास मदत हवी असल्यास कायद्यातील तरतुदीप्रमाणे ती जनमाहिती अधिकारी यांनी करणे अभिप्रेत आहे.
  • जन माहिती अधिकारी यांनी मापण मागितलेली माहिती ३० दिवसात पुरविणे आवश्यक आहे. सदरची माहिती ग्राम पंचायतीकडे ठेवलेली नसली तर जनमाहिती अधिकारी सदरचा अर्ज संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करेल.
  • विविध कालमर्यादेत माहिती पुरविली नसल्यास सदरची माहिती विनामुल्य देण्यात येईल. 
  • ग्राम पंचायतीच्या भिंतीवर प्रसिद्ध केलेल्या माहितीची  तपासणी करण्यासाठी नागरिकांस अर्ज करणे, किंवा अर्ज फी भरणे किंवा ३० दिवसापर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता नाही.
  • नागरिकांस माहिती मिळाली नाही किंवा दिशाभूल करणारी माहिती मिळाली तर त्याला /तिला माहिती अधिकारातील माहिती कलम १८ नुसार तक्रार दाखल करता येईल. 
  • नागरिकांस प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करता येईल.
Scroll to Top